
ठाणे (दि.04 ) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाची स्थापना कंपनी कायदा 1956(1) च्या तरतूदीनुसार सामाजिक न्याय विभागातंर्गत दि.11 जुलै,1985 रोजी शासनाने केली आहे.
महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीतील मातंग समाज व त्यातील 12 पोटजाती-मांग, मातंग, मिनीमादीग, मादीग, दानखणी मांग, मांगमहाशी, मदारी, राधेमांग, मांग गारोडी, मादगी, मादिगा या पोटजातीतील 18 ते 50 या वयोगटातील दारिद्रय रेषेखालील ज्यांचे वार्षिक उत्पन्न मर्यादा रु.3,00000/- (अक्षरी तीन लाख मात्र) पर्यंत आहे. अशा बेरोजगारांकरिता साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत विविध कर्ज योजना राबवविण्यात येतात.
शासन निर्णय क्र.एलएएस-2022/ प्र.क्र.94/ महामंडळे, दि.4 नोव्हेंबर 2022 अन्वये महामंडळाचे पुढील योजनांचे उद्दिष्ट मुख्य कायार्लयाचे दि.19 जून 2025 अन्वये जिल्हा कार्यालय ठाणे येथे प्राप्त झाले असून ते उद्दिष्ट पुढील प्रमाणे, अनुदान योजना-75, बिजभांडवल योजना 60 व थेट कर्ज योजना-60 या थेट कर्ज योजने अंतर्गत जिल्हा कार्यालय ठाणे 50 चे भौतिक उद्दिष्ट (50% पुरुष व 50% महिला) देण्यात आलेले आहे. यामध्ये ग्रामीण भागासाठी प्राधान्य राहील. तसेच राज्यस्तरावरील क्रिडा पुरस्कार प्राप्त व्यक्तींना तसेच सैन्य दलातील वीरगती प्राप्त वारसापैकी एका सदस्यास प्राधान्याने लाभ देण्यात येईल.
थेट कर्ज योजनेचे अर्ज जिल्हा कार्यालयात दि.03 जुलै 2025 पासून विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. या कर्ज अर्जाकरिता ठाणे जिल्ह्यातील खालील नमूद केलेल्या पात्रता व अटी शर्ती व निकषांची पूर्तता करणारा अर्जदार पात्र राहील. अशा इच्छूक अर्जदारांनी / लाभार्थ्यांनी आवश्यक त्या कागदपत्रांच्या पूर्ततेसह कर्ज अर्जाचा फॉर्म सुव्यवस्थित 3 प्रतीत भरुन महामंडळाच्या जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, 3 रा माळा, दत्तवाडी, श्री. स्वामी समर्थ मठासमोर, सह्याद्री शाळेच्या बाजुला खारेगांव, कळवा (प), जिल्हा ठाणे येथील कार्यालयात सकाळी 10.00 ते 5.00 या कार्यालयीन वेळेत (सार्वजनिक सुट्टी वगळून) सादर करावा. अर्ज सादर करण्याचा अंतिम दि. 25 जुलै, 2025 पर्यंत राहील. कर्ज प्रकरणासाठी आवश्यक कागदपत्रांचा तपशिल पुढीलप्रमाणे
1. अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहीवासी असावा.
2. मातंग समाज व त्यातील 12 पोटजातीपैकी असावा.
3. अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्ष असावे.
4. अर्जदाराने यापूर्वी महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
5. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु.3,00000/- (अक्षरी तीन लाख मात्र) यापेक्षा जास्त नसावे.
6. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ घेता येईल.
7. व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे कोटेशन, ज्ञान व अनुभव / प्रशिक्षित असावा.
8. महामंडळाच्या प्रचलित नियमानुसार व्यवसायास अनुरुप असलेली आवश्यक ती कागदपत्रे / प्रमाणपत्रे /करारपत्रे/कर्जमागणी अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे.
9. आधारकार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, मतदान कार्ड, व्यवसायचे प्रशिक्षण घेतलेले प्रमाणपत्र इ.
10. बिजभांडवल व थेट कर्ज प्रकरण मंजुरी नंतर दोन जामीनदार (एक जामीनदार शासकीय /निमशासकीय नोकरदार व दुसरा जामीनदार मालमत्ताधारक असावा.)
कार्यालयाचा पत्ता – जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या), डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, 3 रा मजला, दत्तवाडी, स्वामी समर्थ मठासमोर, सहयाद्री शाळेच्या बाजूला, खारेगांव, कळवा (प.), ठाणे – 400605. दूरध्वनी क्र. 022-25388413.
कर्जप्रस्ताव सादर केल्यानंतर महामंडळाच्या प्रचलित नियमानुसार मंजूरी संदर्भातील आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या), जिल्हा कार्यालय, ठाणे जिल्हा व्यवस्थापक बाबासाहेब तडाखे यांनी कळविले आहे.
Author Profile
Latest entries
ताज्या बातम्याJuly 5, 2025रमेश संमुखराव यांना यंदाचा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार
ताज्या बातम्याJuly 4, 2025लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत विविध कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छूकांनी 25 जुलै पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
ताज्या बातम्याJuly 4, 2025‘विद्यार्थ्यांना एसटी पास थेट शाळेत’ योजनेद्वारे ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला लाभ; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
ताज्या बातम्याJuly 2, 2025महाराष्ट्र राज्यातील 1 एप्रिल 20219 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबरप्लेट (HSRP) बसविण्यास 15 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदतवाढ