
ठाणे : यंदा असह्य उकाड्यातही ठाणेकरांना आंबा महोत्सवाची धूम अनुभवता येणार आहे. महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पणन मंडळ पुरस्कृत तसेच,संस्कार संस्था व कोकण विकास प्रतिष्ठानच्यावतीने १ मे ते १२ मे या कालावधीत ठाण्यातील गावदेवी मैदान येथे भव्य आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती संस्कारचे अध्यक्ष आमदार संजय केळकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. आंबा महोत्सवाचे हे यंदाचे १८ वे वर्ष आहे. यावेळी मुख्य आयोजक आ. संजय केळकर यांच्यासमवेत कोकण विकास प्रतिष्ठानचे राजेंद्र तावडे, ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, माजी उपमहापौर सुभाष काळे, अशोक भोईर, परिवहन सदस्य विकास पाटील, संतोष साळुंखे, विष्णू रानडे उपस्थित होते.
Related posts:
महत्वाची माहिती । सायबर गुन्ह्यांन बाबत 1945 क्रमाकांवर तक्रार नोंदवता येईल
March 26, 2025ताज्या बातम्या
जिल्हा परिषदेचे 100 दिवसांचा कृती कार्यक्रम अंतर्गत नवनियुक्त कर्मचारी यांचे पायाभूत प्रशिक्षण
March 22, 2025ताज्या बातम्या
लहान मासे पकडून खरेदी विक्री केल्यास दंडात्मक कारवाई
April 3, 2025ताज्या बातम्या
Please Share and like us: