
हिंदी सक्तीबाबत घेतलेले दोन्ही शासन निर्णय रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला. तसेच हिंदी सक्ती करावी का, किंवा त्रिभाषाबाबतचा निर्णय घ्यावा का आणि त्याची अंमलबजावणी कशी करावी? याबाबत अभ्यास करण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाईल, अशी घोषणा केली. ही समिती जो अहवाल देईल त्या आधारावर निर्णय घेतला जाईल, असं देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं.
Please Share and like us: